मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना, शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उभारा
शिक्षकांनी मुख्यत्वे शिकविण्याचे काम करावे
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आज शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगवर भर देत असताना राज्यातील वंचित व दुर्गम शाळांसाठी 'व्हर्च्युअल क्लासरूम' अत्यंत महत्वाचे ठरतील. 'व्हर्च्युअल क्लासरूम' यंत्रणेमध्ये फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवणार नाही तर दोन्ही बाजूंनी संवाद होण्यास मदत होईल.शिक्षण हा राज्य सरकारचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हेच शिक्षकांचे काम असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामांचा बोजा पडणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला यावेळी केल्या.
ई- लर्निंगवर विभागाने अधिकाधिक भर द्यावा
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे व काळानुरूप शिक्षणाची कास धरावी या उद्देशाने ई लर्निंगवर भर देत असताना विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी आठवी, नववी आणि दहावीचा अभ्यासक्रम देता आला तर विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होईल. विज्ञान विषय ॲनिमेशन स्वरुपात आणि गणित विषय अधिक सोप्या पध्दतीने मांडण्यात आला तर या दोन विषयांबद्दल विद्यार्थ्यांना वाटणारी भीती नक्कीच कमी होईल. ई लर्निंगचा आणखी एक फायदा होईल तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होईल. त्यामुळे र्व्हच्युअल क्लासरुमबरोबरच ई लर्निंगवर विभागाने अधिकाधिक भर द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
स्कूल बसची सुरक्षितता
शिक्षण क्षेत्रात शासनाबरोबर काम करण्याची उद्योजकांनी सहमती दाखविल्याने शालेय शिक्षण विभागाच्या उपक्रमात या उद्योजकांची मदत कशी घेता येईल याबाबतही नियोजन करण्यात यावे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे, शाळेत येण्या जाण्यासाठी असलेल्या स्कूल बसची सुरक्षितता हे शाळांनी तपासून घेणेही आवश्यक असल्याचे श्री. ठाकरे यांनी यावेळी सूचित केले.यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक अश्विनी जोशी, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, शिक्षण व क्रीडा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अनुदान कधी देणार आहात साहेब उपाशीपोटी कस शिकवायच?
ReplyDeleteसाहेबांना विनंती उपाशी पोटी असलेल्या शिक्षकांचा प्रश्न सोडवा एवढीच विनंती .
ReplyDeleteविनाअनुदानित शिक्षकांच्या पोटातच नाही तर ओठात कसे येईल साहेब
ReplyDeleteसाहेब अनुदान कधी देणार
ReplyDeleteअनुदानाच काय मुख्यमंत्री साहेब अस किती दिवस चालणार सरकार बदलणार पण आमचा विचार कोण करणार आम्ही आमचे ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणेच करतोय पण आम्हालाही पोट आहे
ReplyDelete
ReplyDeleteशिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा विद्यार्थ्यांचे आपोआप सुटतील
मुख्यमंत्री साहेब सर्वात अगोदरउपाशीपोटी शिकवणाऱ्या शिक्षकांनाअनुदान द्या,व नंतर चालुद्या,जे अगोदरच्या सरकारने केले ते तुम्ही करू नका विनाअनुदानित कलंक पुसून टाका, एक 10वर्ष बिन पगारी शिक्षक
ReplyDelete��������
ReplyDeleteसाहेब तुम्हीच या मुख्यमंत्री पदावर बसावे ही च अपेक्सा होती कारण मराठी माणसांना कळेल की विनाअनुदानित शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र काम उपाशी पोटी करत आहे आमचं आणि आमच्या उपाशी तपासी लेकरांच्या आशीर्वाद लागेल हो साहेब मा,बाळासाहेबांच्या आशीर्वादाने साहेबाना सद्बुद्धी मिळावं जेणेकरून उपाशी विनाअनुदानित शिक्षकाचा घराची चूल पेटली जाईल आणि अश्रूंना आश्रय मिळेल
ReplyDeleteविनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे 20 वर्ष बिनपगारी शिक्षक काम करत आहेत याच शासनाने भान ठेवून काम करा
ReplyDeleteप्रचलित अनुदान सूत्र कधी लागू करणार साहेब फार अपेक्षा आहे साहेब
ReplyDeleteजुनी पेन्शन द्या
ReplyDeleteअनुदानाच काय मुख्यमंत्री साहेब अस किती दिवस चालणार सरकार बदलणार पण आमचा विचार कोण करणार आम्ही आमचे ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणेच करतोय पण आम्हालाही पोट आहे
ReplyDelete20% shalanna 100% anudan dya Saheb .
ReplyDeleteविनाअनुदानित शिक्षकांच्या पोटातच नाही तर ओठात कसे येईल साहेब
ReplyDelete2012/2013 नैसर्गिक तुकडी पात्र शाळा वरील शिक्षकांना अनुदान मंजूर केव्हा मिळेल मंत्रालय स्तरावर पात्र नैसर्गिक तुकडी आहे पण अनुदान नाही
ReplyDeleteखूप मोठ्या उत्साहात शिवशेना सरकार कडे विनाअनुदानित शिक्षक पाहत आहे अवो साहेब, तावडे प्रमाणे झुलवत ठेवु नका म्हणजे मिळवलं,
ReplyDeleteखाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना बरेच संस्थाचालक व मुख्याध्यापक हे त्या शिक्षकाच्या मताप्रमाणे शिकवू देत नाहित. ते त्यांच्या शिकवण्यात अडथळे आणतात. तेथील कर्मचाऱ्यांना मासिक वर्गणी जमा करावी लागते त्यामुळे शिक्षकाचे शिकवण्यात मन कसे लागेल त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार त्यासाठी त्या शाळेवर सरकारचे लक्ष असावे.
ReplyDeleteसाहेब शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करावी
ReplyDeleteशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सहानुभूती रास्त आहे पण शिक्षण देणाऱ्या शिक्षकांविषयी आपुलकी सूर्य केव्हा उजळेल?
ReplyDeleteशिक्षकांचा माहिती अहवाल व ईतर कागदपत्राचा बोझा कमी करा व शिक्षक भरती लवकर पुर्ण करा अन्यथा शिक्षणाचा दर्जा खुप खालावत आहे कागदावर प्रगती व वर्गात अधोगती अशी परिस्थिती आहे.
ReplyDeleteमी सत्र 2017-18अतिरिक्त शिक्षक असुन शिक्षणाधिकारी माध्य अकाेला यांनी मुळ आस्थापनेवर पाठविले नाही.मुद्दाम 1वर्षापासुन न्यायालयीन प्रकरण मला शाळा शिकविणयासाठी यात शासनाचेच नुकसान आहे..
ReplyDeleteमराठी शाळांना 100% अनुदान द्या.
ReplyDelete